Next
शिवराम
Friday, March 10 | 08:53 AM
छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे दैवत आहे. त्यांचे कार्यकर्तुत्व व गुण आजही आदर्श ठरतात. परकीयांच्या राज्यात हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न शिवरायांनी पाहिले आणि ते साध्यही केले. हाच धागा अॅड. दादासाहेब राजेशिर्के यांना डॉ. रामचंद्र महाराज पारनेकर यांच्या कार्यात आढळला.
त्यातून त्यांनी शिवराम या पुस्तकातून शिवाजी महाराज आणि रामचंद्र महाराज म्हणजेच जीवनसम्राट यांच्यातील साम्य वाचकांपुढे मांडले आहे. राजकीय गुलामगिरीतून जनतेत आलेली मरगळ दूर करून दोघांनीही स्वधर्माची शिकवण देऊन मानव जातीचा चेहरामोहरा बदलून टाकला, असे यात म्हटले आहे.
या दोघांच्या गौरवगाथेत राष्ट्रीय, सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक व अगदी कौटुंबिक अंगाने त्यांचे जीवनचरित्र वर्णन केले आहे. दोघांच्या जीवनातील पूर्णवाद त्यांनी स्पष्ट केला आहे.
Feel free to share this article:
https://www.bytesofindia.com/P/HZLUBA